Posts

गणेशाचं पत्र

Image
नमस्कार,  कसे आहात सर्वजण? खुश आहात ना? माझी आतुरतेने वाट बघताय ना? पण काय त्या कोरोनाने तिकडे संपूर्ण थैमान घातलय म्हणे. त्याच विषयी पत्र लिहिलं आहे. आता पुढील महिन्यात आमचं आगमन होणार. आम्ही दरवर्षी एक महिना आधीच गाड्यांचं रिजरव्हेशन करून ठेवतो. पण ह्या वर्षी कोरोना मुळे गाड्याच बंद आहेत. त्यामुळे अद्याप आम्हाला काहीच रिजरव्हेशन करता येत नाहीये.  खरं सांगायचं झालं तर आता इतकी वर्षे तुम्हा सर्वांचे प्रेमाने भरलेले मोदक लाडू, गोड गोड जेवण ह्या सगळ्याची आता सवय झाली आहे. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं प्रेम, श्रद्धा, भक्ती हे सर्व पाहता तुम्हाला भेटल्याशिवाय राहवत नाही. म्हणूनच तर मागच्या वर्षी जोरदार पाऊस असूनही आलो होतो. पण ह्या वर्षी गाड्या बंद असल्याने येणं कठीण दिसत आहे. तरी तुमच्यातलेच काही पोलीस आणि डॉक्टर किंवा नर्सेस हे कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मला खरंच ह्या सर्व लोकांचं फार कुतूहल वाटतं. जर कोरोना दूर झाला तर आमच्या गाड्या देखील सुरू होतील आणि आम्हाला येण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचा सहभाग देखील फार म...

कोरोनाचे पत्र

Image
नमस्कार!  काय मग मंडळी, ओळखलंत ना मला? मी तोच जो सध्या तुमच्या जीवावर टिचून बसलेला आहे. मी तोच ज्याला घाबरून तुम्ही लोकांना हात मिळवण्याचं सोडून आजकाल रामराम करत आहात. मी तोच जो चीनमधून पसरत पसरत तुमच्या देशाची वेस ओलांडून आलो आहे. आता तरी ओळखलंत ना?  खरं तर धमकी द्यायलाच आलो आहे. कृपा करून दूर राहा माझ्यापासून. जर माझ्याशी जवळीक करायला आलात  तर स्वतःचा जीव मला अर्पण करावा लागेल. तसं बघावं तर टेलिकॉम कंपन्या, रेल्वे स्थानक, न्यूज चॅनल्स सर्वच जण तुम्हाला माझ्यापासून दूर राहण्यास सुचवत आहेत. पण त्यातून जरी तावडीत सापडलात तर मात्र काही खैर नाही. आणि मी काही तुमची शेवटची इच्छा वगरे पूर्ण करणार नाही हो. त्यामुळे जराशी सावधानता बाळगाच.  तसं स्वतःचं कौतुक किंवा मोठेपणा सांगावा म्हणून नाही, पण माझी दहशत एका दहशतवाद्याला देखील लाजवेल इतकी भयंकर आहे बरं का. लगेच आपली एन्ट्री झाली काय अन् लगेच सगळे शाळा, कॉलेज सगळं बंद. मोठमोठ्या कंपन्यांनी देखील मला घाबरून कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. व्वा! काय दहशत आहे आपली. पण एक गोष्ट कळत नाही. ते तुमच्या सैनिक ना पोलीस लोकां...

कुसुमाग्रजांना पत्र

आदरणीय कुसुमाग्रजजी,  आम्ही फारच धन्य आहोत जे आम्ही या मराठी मातीत जन्माला आलो. तुमच्यासारखे महान साहित्यकार आम्हाला लाभले आणि त्यामुळेच आज मराठी भाषा समृद्ध झाली हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. तुम्ही मराठी भाषेतील केलेल्या विकासामुळेच १९८७ साली तुम्हाला 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले. आणि म्हणूनच तुमचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.  मराठी साहित्य आणि संस्कृतीचा विकास करत पदोपदी तुम्ही मराठीचे महत्त्व दाखवून दिले आहे. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इथे परकीचे पद दाबू नका।। भाषा मारता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका।। ह्या तुम्ही लिहिलेल्या ओळींमधून भाषेचे महत्त्व स्पष्ट होते. तरी आज दुर्दैवाने some people think that using English language rather than Marathi will increase their standard of living और कुछ लोगों को मराठी से ज्यादा हिंदी में बात करना अच्छा लगता है। आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्रात राहून देखील मराठी भाषेत बोलायला लाज वाटते. ...